युवानेते विवेकभैय्या कोल्हेंसह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे असंख्य युवक रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून
संजीवनी युवा प्रतिष्ठानची ‘शिवऊर्जा यात्रा’ जगातील सर्वोत्तम रायगड किल्ला अनुभवणारी – युवानेते विवेकभैय्या कोल्हे
प्रशांत टेके पाटील अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी –
संजीवनी युवा प्रतिष्ठानचा रायगडावर शिवचरणी अभूतपूर्व मेळा
संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित, शिवऊर्जा यात्रा वर्ष दुसरे या यात्रेस समस्त शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मागच्या वर्षी हा विचार आला की आपण डीजे न लावता, वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुका न काढता खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविले गेले पाहिजेत या हेतूने काहीतरी आपण करावं आणि म्हणून ही संकल्पना मनामध्ये आली की दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा मिळण्यासाठी गडकिल्ल्यावर युवकांसमवेत जाऊन त्या ठिकाणचा इतिहास जाणून घ्यावा. त्या ठिकाणी कशाप्रकारे संघर्षमय वातावरणामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी तसेच मावळ्यांनी योगदान दिले हे समजून घ्यावे. म्हणून प्रथम वर्षी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ला येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून,दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम किल्ला असणाऱ्या स्वराज्याची राजधानी रायगडावरती आलो प्रतिपादन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले.
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित “शिवऊर्जा यात्रा किल्ले रायगड” मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी या शिवऊर्जा यात्रेमध्ये कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांमधील ज्येष्ठांसह युवक शिवभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रायगडावर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष दुमदुमला होता. यावेळी समस्त शिवभक्तांसह युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
ज्या ठिकाणाहून लोककल्याणकारी योजना, अठरापगड जाती, बारा बलुतेदार या सगळ्यांना एकत्र करत स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न मासाहेब जिजाऊंनी पाहिले, जिथून कित्येक वर्षे राजकारभार चालला या रायगडावर संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत. रायगडावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवऊर्जा निर्माण झाली आहे. पावणे चारशे वर्षांपूर्वी या किल्ल्याची उभारणी झाली. या मातीमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. छत्रपती शिवराय तसेच त्यांच्या समवेत असणाऱ्या मावळ्यांच्या योगदानामुळे आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणून आपला इतिहास कोणी विसरता कामा नये. या प्रत्येक मातीमध्ये, गडकिल्ल्यांच्या दगडामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास घडलेला आहे. स्वराज्य निर्माण करण्याचं काम सर्वांनी मिळून आपल्या परीने योगदान देऊन केले आहे त्यामुळं मावळ्यांचे योगदान स्मरणात ठेवणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या क्षेत्रामध्ये झोकून काम केलं तर निश्चितपणे आपल्या क्षेत्रात यश प्राप्त होईल,ती एक देशसेवाच आहे असे ते म्हणाले.
इतिहासाचे अभ्यासक व्याख्याते प्रा. गणेश लोळगे म्हणाले की, प्रत्येक माणसासाठी आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. या संघर्षाला सामोरे जाताना खऱ्या अर्थाने जिथे आपल्याला मोठी ऊर्जा मिळते, ते ऊर्जेचे आणि निष्ठेचे ठिकाण म्हणजे रायगड होय. आजचा काळ फार महत्त्वाचा आहे. ज्या काळामध्ये तरुणांना योग्य दिशा दाखवून चांगल्या पद्धतीने शिवविचार पेरणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपले भाग्य आहे की आपल्याकडे युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासारखे नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून हा शिवविचार दरवर्षी प्रत्येक गड-किल्ल्यापर्यंत आपण सर्वजण मिळून पोहोचवत आहोत. शिवविचारांचा शिवयज्ञ असा अखंडपणे चालत राहावा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करत हे स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा एक-एक विचार सातासमुद्रापार पोहोचलेला दिसतो आहे. तेव्हा तुमच्या-आमच्यासारख्यांना हा विचार ऊर्जा देऊ लागतो, असे ते यावेळी म्हणाले.
या शिवऊर्जा यात्रेमध्ये कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांतील युवक शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रायगडावर मोठ्या भक्तिभावाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले व किल्यावर स्वच्छता करत ऐतिहासिक ऊर्जा निर्माण करणारे क्षण शेकडो युवकांनी अनुभले.
चौकट
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी ज्यावेळी वीज कोसळून मेघडंबरीचे नुकसान झाले होते त्यावेळी स्वतः पुढाकार घेऊन संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून मेघडंबरीची दुरुस्ती करून घेत आपल्या ऐतिहासिक अस्मिता संवर्धनासाठी केलेल्या कार्याची आठवण यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली.
